सातवा वेतन आयोग म्हणजे सरकारी नोकरदारांच्या पगाराशी संबंधित एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत राज्य सरकारचे कर्मचारी काम करतात. सध्या या कर्मचार्यांना महागाई भत्ता म्हणजेच “डिए” वाढण्याची वाट बघावी लागत आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात ५३% वरून ५५% झाला आहे. म्हणजे त्यांना २% जास्त पैसे मिळायला सुरुवात झाली आहे, आणि ही वाढ जानेवारीपासून लागू झाली आहे.
हेच पाहून महाराष्ट्र राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व राज्य कर्मचारी विचार करत आहेत की, आपलाही महागाई भत्ता कधी वाढेल?
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या शेवटी म्हणजे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल आणि अधिकृत कागदपत्र म्हणजे “जीआर” जारी करेल.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ५३% महागाई भत्ता मिळतो. पण लवकरच तो ५५% होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही वाढ जून महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होईल असं सांगितलं जातंय. पण अजून सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाहीये.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही भत्ता वाढ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या पाच महिन्यांचा फरक म्हणजेच जास्त मिळणारे पैसे एकत्र दिले जातील.
जून महिन्याचा पगार मिळताना राज्य कर्मचारी याचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे महागाई भत्त्याच्या या बदलाची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि सरकारकडून निर्णयाची वाट पाहत आहेत.