पंजाबराव डख यांचा मोठा पावसाचा इशारा! ‘या’ तारखांना ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

राज्यात सध्या हवामानात मोठे बदल होत आहेत. काही आठवड्यांपासून अनेक भागात पाऊस फारसा पडलेला नव्हता. कुठे थोड्या सरी पडल्या तर काही ठिकाणी अजूनही पाऊसच नाही. पण आता हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे की, लवकरच सगळ्या महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्यांनी सांगितलं की, 10 जूनपासून पावसाला सुरुवात होईल आणि 20 जूनपर्यंत वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडेल.

10 आणि 11 जूनला दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल. त्यानंतर 12 आणि 13 जूनला विदर्भात पाऊस पडणार आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण चांगलं राहील. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू वाढत जाईल.

11 जूनपासून मराठवाड्यातही पावसाची सुरुवात होणार आहे. बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रोज पाऊस पडेल, असा अंदाज आहे. या भागात शेतकऱ्यांना हा पाऊस खूप उपयोगी ठरणार आहे, कारण खरीप पिकं पेरायला याच पावसाची गरज असते.

मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि संगमनेर या भागांमध्ये 13 ते 18 जूनदरम्यान जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांनी थोडी काळजी घ्यावी लागेल. जोरदार पावसामुळे पूर, वीज पडणे किंवा वाहतूक अडथळे येऊ शकतात. पण दुसरीकडे, पाण्याची टंचाई असलेल्या भागात पाण्याचा साठा वाढेल, ही चांगली गोष्ट आहे.

12 जूननंतर राज्यात अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढणार आहे. 13 ते 20 जूनदरम्यान दररोज पाऊस पडेल असं हवामान अभ्यासक सांगत आहेत. यामुळे शेतीसाठी चांगले वातावरण तयार होईल आणि खरीप हंगाम सुरू होण्यासाठी चांगली वेळ ठरेल.

पण तरीही तज्ज्ञ सांगत आहेत की शेतकऱ्यांनी पेरणीसाठी थोडं थांबावं. पावसाचा जोर आणि सातत्य बघूनच योग्य वेळेची वाट पाहावी, नाहीतर पिकं नीट उगवणार नाहीत आणि नुकसान होऊ शकतं.

Leave a Comment